नारायण नागबली विधी काय आहे? तो कशासाठी करतात?
आपण वर कालसर्पयोग हा काय आहे व त्याची फळे कशी घाबरवून टाकतात हे बघितलं? साहजिकच मग आता यावर परिहारक उपाय, तोडगा काय? असा प्रश्न असणारच. कालसर्प योगाचे निवारण करण्यासाठी नारायण नागबली विधी सांगितला जातो. सर्पशाप, नागपूजा वगैरे गोष्टींंचा कालसर्पयोगाशी बादरायण संबंध लावून परिहार म्हणून असे विधी सांगितले जातात. हिंदू धर्मात नाग, साप यांचा देवादिकांशी संबंध असल्याने त्यांना फार धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. हल्लीच्या काळात प्रत्येक क्षेत्रात जशा अनिष्ट प्रथा येतात तशा त्या ज्योतिषशास्त्रातही आलेल्या आहेत. ज्योतिषी व तीर्थक्षेत्रातले भिक्षुकवर्ग यांचेही लागेबांधे वाढले आहेत. त्यांची 'कट प्रॅक्टिस` चालू झाली आहे. परिस्थितीने गांजलेला माणूस मनाने हळवा बनतो. ज्योतिषी सांगतो म्हणून नारायण-नागबली विधीसाठी दोनचार हजार रूपये खर्च करायलाही तयार होतो. एवढं सगळ केलंय् तर हेही करुन बघू असा तो विचार करतो. हा विधी त्रिंबकेश्वरला घाउक प्रमाणावर केला जातो.
स्त्रोत - येथे पहा.