गुरुबल कशासाठी बघतात?
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या शुभ ग्रहाची साथ आहे की नाही हे पहातात. हे मंगल प्रसंग असतात त्यामुळे अशा प्रसंगी अमंगल ग्रहांची वाकडी नजर पडून काही अमंगळ होउ नये म्हणून गुरुबळ बघितले जाते. गुरु हा ग्रह नैतिक बळ देतो, चांगले गुण वृद्धिंगत करतो. गुरु जर अनुकूल नसेल तर गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन करून तो अनुकूल करून घेता येतो.
एकूण हा प्रकार पुतळयाचे अनावरण, संस्थेचे उदघाटन, भूमीपूजन, वृक्षारोपण या वेळी मंत्री, पुढारी जसे उपस्थित लागतात त्या प्रकारचा आहे. जेवढा मंत्री पॉवरफूल तेवढा सोहळा जंगी. त्याच्या सोयीसाठी प्रसंगी वेळा पुढे मागे ढकलल्या जातात.
स्त्रोत - येथे पहा.